पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग ५ हा कष्टकरी आणि कामगारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. भोसरीतील गवळीनगर, आळंदी रस्ता आणि दिघी रस्ता या दोन समांतर रस्त्यांच्या दरम्यान हा दाट लोकवस्तीचा भाग वसलेला आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील नागरी सुविधा कोलमडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
१. ‘पोल्टीकल वझीरच्या मते: मतदारांचे समीकरण
एकूण मतदार: ४४,६९१.
स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (२४,०७८) आणि महिला मतदार (२०,६१०)
आरक्षण: हा प्रभाग ४ जागांसाठी आरक्षित असून त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे: ‘अ-ओबीसी महिला’, ‘ब-ओबीसी’, ‘क-सर्वसाधारण महिला’ आणि ‘ड-सर्वसाधारण (खुला)’.
२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या
या प्रभागात प्रामुख्याने कामगार आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश होतो:
गवळीनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग, रामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर , तुकारामनगर, महादेव नगर, श्रीराम कॉलनी, आणि ज्ञानेश्वर कॉलनी.
३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा ‘डोंगर’ आणि संतापलेली जनता
प्रभागातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत:
पाणी टंचाई: तुकारामनगरमधील पाण्याची टाकी जुनी आणि गळकी झाली आहे. गुरुदत्त नगरमध्ये नवीन टाकी बांधून तयार आहे, पण तिचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
रस्त्यांची दुरवस्था: दिघी रस्त्याचे डांबरीकरण रखडले असून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आळंदी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
वाहतूक कोंडी: भोसरी-आळंदी रस्त्यावर अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी होते.
वीज आणि ड्रेनेज: परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ड्रेनेज लाईन चोक झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहते, ज्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
४. विश्लेषण: प्रभाग ५ (पिंपरी-चिंचवड)
बळ:- दाट लोकवस्तीमुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रभाग.
उणिवा:- अंतर्गत रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरण आणि अनियमित पाणीपुरवठा.
संधी:- नवीन पाणी टाकी सुरू करून आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारून जनतेचा विश्वास जिंकण्याची संधी.
धोके:- ‘ट्रॅफिक’ आणि ‘अस्वच्छते’मुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा तीव्र रोष.
५. पोल्टीकल वझीरच्या सूचना:-
प्रभाग ५ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ राजकीय घोषणा देऊन चालणार नाही. जो उमेदवार ‘पाण्याची गळती’ थांबवून ‘दिघी रस्त्याचे काम’ प्राधान्याने पूर्ण करेल, त्याच उमेदवाराला गवळीनगर आणि रामनगरची जनता आपला प्रभागाचा नेता म्हणून पसंती देईल.



