पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग ४ सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आहे. दिघी आणि बोपखेल या दोन प्रमुख गावांचा समावेश असलेल्या या प्रभागात नागरी सुविधांचे मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. विकासाची कामे संथ गतीने सुरू असल्याने येथील मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे.
१. पोल्टीकल वझीरच्या मते: मतदारांची आकडेवारी
एकूण मतदार: ५२,५०३,
स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (२७,५३३) आणि महिला मतदार (२४,९६५).
आरक्षण: हा प्रभाग ४ ‘अ-अनुसूचित जाती (SC) महिला’, ‘ब-अनुसूचित जमाती (ST)’, ‘क-ओबीसी महिला’ आणि ‘ड-खुला प्रवर्ग’ अशा चार जागांसाठी आरक्षित आहे.
२.या प्रभागामधील समाविष्ट भाग:-
प्रामुख्याने दिघी गावठाण, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाड नगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर आणि कृष्णानगर या भागांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: विकासाचा ‘धिया’ गतीने सुरू:-
प्रामुख्याने दिघी गावठाण, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाड नगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर आणि कृष्णानगर या भागांचा समावेश होतो.
सांडपाण्याची समस्या: दिघी गावठाण आणि आदर्श नगरमधील सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने हे पाणी लष्करी हद्दीत सोडले जात आहे, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
शिक्षण आणि आरोग्य: साई पार्क कॉलनीतील महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा बांधून तयार आहे, पण ती अद्याप सुरू झालेली नाही. तसेच, परिसरात सरकारी रुग्णालयाची नितांत गरज आहे.
खेळासाठी मैदान नाही: गजानन महाराज नगरमधील खेळाच्या मैदानाच्या जागी रहिवासी घरे उभी राहिली आहेत, त्यामुळे मुलांसाठी उद्यान किंवा मैदान उरलेले नाही.
अग्निशमन केंद्राचे काम रखडले: दिघी गावठाणामध्ये अग्निशमन केंद्राचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे.
४. विश्लेषण: प्रभाग ४ पिंपरी-चिंचवड:-
बळ:- झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्या.
उणिवा:- वीज, रस्ते आणि सांडपाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव.
संधी:- रखडलेले प्रकल्प (शाळा, भाजीमंडई, अग्निशमन केंद्र) वेळेत पूर्ण झाल्यास सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळेल.
धोके:- पावसाळ्यात होणारी सांडपाण्याची कोंडी आणि पुराचा धोका नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो.
५. पोल्टीकल वझीरच्या सूचना:-
प्रभाग ४ मध्ये यावेळी ‘सांडपाण्याचा निचरा’ आणि ‘रखडलेली शाळा’ हे प्रमुख मुद्दे असतील. जो उमेदवार ‘बोपखेलला स्वतंत्र पोलीस चौकी’ आणि ‘रस्ते रुंदीकरण’ याचे ठोस नियोजन मांडेल, दिघी-बोपखेलची जनता त्यालाच आपला नेता निवडेल.



