मंडळी नुकत्याच पाच राज्यांतील पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना अत्यंत मोठा आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय.
पाच राज्यांमधील निवडणुकीमधील भाजपाच्या विजयावर भाष्य करतांना शिवसेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ चा संदर्भ देत केलेल्या भाषणापासून ते अगदी ओवेसीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली आहे. भाजपला विजय कशामुळे मिळाला यासंदर्भात शिवसेनेनं भाष्य करतांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या गैरवागणुकीमुळे शिवसेनेन केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे.
शिवसेनेच्या सामनामध्ये नेमकं काय?



