१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

पुलोद

मंडळी भारतीय देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढेल. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे सरकार स्थापन झाले.

 

मात्र १९७८ मध्ये अशा एका पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल होत. ज्याच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली.

 

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

 

जेष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात आणीबाणीचे आदेश दिले. या आणीबाणीला देशातील जनतेने तीव्र विरोध केला आणि १९७७ मध्ये ही आणीबाणी मागे घेण्यात आली.

 

याच काळामध्ये झालेल्या एका निवडणूकीमध्ये विरोधी पक्षांच्या संघटनेतून जन्माला आलेल्या ‘ जनता पक्षाने ‘ काँग्रेसचा दारुण पराभव केला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला नाराज होऊन काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले.

 

इंदिरा गांधी यांचा एक गट आणि ब्रह्मनंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांचा दुसरा गट तयार झाला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि शरद पवारांसारखे नेते यशवंतरावांसोबत गेले तर तिरपुडेंसारखे नेते गेले इंदिरा गांधींसोबत.

 

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

 

मात्र १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या दोन्ही गटांना जनता पक्षाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण जनता पक्षाकडे बहुमत नसल्याकारणाने दोन्ही काँग्रेसने पुन्हा एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं.

 

महाराष्ट्रातील हे पहिल आघाडी सरकार होत. मात्र आंतरीक वादामुळे हे सरकार जास्त वेळ टिकू शकलं नाही. शरद पवार हे १९७८च्या जुलै महिन्यात आपले ४० आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. 

 

शरद पवारांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर ते जनता पक्षाशी जाऊन मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये ‘पुलोद’ म्हणजेच ‘पुरोगामी लोकशाही दल’ नावाचं सरकार स्थापन केल. शरद पवार हे देशातील सर्वात तरुण असणारे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir