१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

गोपीनाथ मुंडे

मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक उलटफेर सम्पूर्ण महाराष्ट्राला दिसून आले. ज्याप्रमाणे २०१९च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्यात विलंब झाला होता.

 

त्याचप्रमाणे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा मुख्यमंत्री नेमण्यात मोठ्या प्रमाणात वेळ झाला होता. तर मंडळी झालं असं की, १९९९ ला शरद पवार यांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढली होती.

 

 

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

 

 

या निवडणुकीमध्ये शिवसेनेला ६९, भाजपा ६५, काँग्रेस ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या होत्या. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या ही १३४ भरली आणि सरकार स्थापन करण्यासाठी आणखी ११ जागांची म्हणजे एकूण १४५ जागांची गरज होती.

 

यावेळी शिवसेनेच सरकार स्थापन झाल असत. मात्र जेव्हा उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवारी वाटप केला तर १५ उमेदवारांना डावलण्यात आलं. तेव्हा त्या १५ उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवली. ज्यामध्ये ११ उमेदवार निवडून आले.

 

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

 

तेव्हा जर या उमेदवारांना उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अडचण गेली नसती. 

 

गोपीनाथ मुंडेच्या मुख्यमंत्री होण्याला राणेंची नाराजी 

 

ज्या प्रमाणे शिवसेनेच सरकार स्थापन न होण्याला उध्दव ठाकरे जबाबदार होते. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री न होण्याला नारायण राणे जबाबदार होते. १९९९ ला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची सरकार स्थापन करण्याची तयारी झाल्यानंतर  भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची ईच्छा व्यक्त केली.

 

यावर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना त्यांचं मत विचारल्यानंतर नारायण राणे यांनी प्रत्यक्षपणे विरोध न करता म्हटलं की ” गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होवो की न होवो मात्र मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणार नाही.” अस सांगून नारायण राणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्री होण्याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता. हे नारायण यांनी आपल्या आत्मचरित्रातसुद्धा सांगितलं आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir