आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

आनंद दिघे

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर केलं.

 

म्हणूनच कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या घरात रहायची गरज पडली नसावी. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

 

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

 

अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

 

एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ झाल्याच्या चर्चाही तेव्हा गदारोळ करायला लागल्या होत्या.

 

आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

 

ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.

 

 

शाखा आणि आश्रमच माझे घर- आनंद दिघे

 

 

प्रसार माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये बोलत असतांना आंनद दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की,

 

” दिघे साहेब कधीही स्वतःच्या घरामध्ये राहले नाही. ते नेहमी भाड्याच्या घरात राहत होते. शाखा आणि आनंद आश्रमच माझं घर आहे.”

 

अस शिंदे यांनी सांगितलं होतं. यावरून समजून येत की, आनंद दिघे म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir