जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !

आदित्य

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे एक जगजाणता व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

 


त्यांची जगावेगळी कल्पकता आणि व्यंगचित्रकारितेच्या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करत भारताच्या राजकारणात एक नवी ओळख निर्माण करत स्वतःच अस्तित्व निर्माण केल

 

 

काळानुसार लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच गेला .आणि काळानुरूप तयार झालेले बाळासाहेबांचे संघटन हे एका पक्षात रूपांतरीत झाले ,आणि सुरुवात झाली ती शिवसेनेच्या सुवर्ण पर्वाची .

 

शिवसैनिक कधी फुटतो का ?

 


बाळासाहेब म्हणायचे

 

मी चाललो तर मोर्चे निघतील आणि थांबलो तर सभा भरतील.

 

याचं वाक्याची तथ्यता ही बाळासाहेबांच्या प्रत्येक कामातून दिसून येत त्यांच्याच कार्याला पुढे नेत त्यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि बाळासाहेबानंतर शिवसेनेची धुरा हातात घेत पक्ष बांधणीचे काम चालू ठेवले

 

 

पण काळानुरूप बदल होत गेला एक काळ असाही आला की पक्षातील लोकांकडूनच बंड पुकारल्या गेले आणि शिवसेना हतबल झाली.

 


हे सगळं चालु असताना उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचा राजकारणातील सक्रियता दिसून आली पक्षासाठीच मर्यादित न राहता त्या वेळी आदित्य ठाकरे प्रत्येक माणसापर्यंत पोहचले आणि आदित्य ठाकरे यांच्यातील नेत्यासोबत आपलासा वाटणाऱ्या एका पुढऱ्याचे दर्शन झाले.

 


महाविकास आघाडीच्या काळात अनेक काम करत लोकांकडून प्रसिद्धी मिळवण्याच काम हे आदित्य ठाकरे यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले आणि शिवसैनिकाच कर्तव्य पार पाडलं.

 

 

तरीसुद्धा सतत विरोधकांकडून होणारी टिका सहन करत या तरुण व्यक्तिमत्वाने खूप काही साध्य करून दाखवले तर हल्लीच त्यांची चर्चा ही होतेय कारणही तसचं आहे कारण त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या नावाचा समावेश या यंदाच्या यंग ग्लोबल लीडर्स यादीत करण्यात आला.

 

मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

 


इतक्या कमी वयात आणि विरोधकांकडून होणाऱ्या टिका सर्वांना दुर्लक्षीत त्यांनी हे सगळं घडवून आणलं तर तेच महाविकास आघाडी च्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान एक युवक त्याच्या नवनवीन योजना देत कसा बदल घडून् आणू शकतो

 

 

हे सांगत आपल्या उमेदवारचा प्रचार केला त्यावेळीं ते नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून पाहायला मिळाले .

 


कुटुंबाचा वारसा जपत त्यांनी केलेली कामगिरी ही पक्षासाठी महत्वाची तर होतीच पण त्यांनी समाजापुढेही एक नवा आदर्श निर्माण केला.

 


आगामी काळ हा शिवसेनेचा असेल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत….

 

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

 

तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir