क्रांतीगाथा अंतिम भाग

क्रांतीगाथा

असे नव्हते की या क्रांतिकारकांची फाशी थांबावी म्हणून प्रयत्न झाले नाही…

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद मैदानात फाशी होऊ नये म्हणून म्हटलं , भगतसिंग यांच्या वडिलांनी सुद्धा प्रयत्न केले , महात्मा गांधी यांनी  सुद्धा व्हाइसरायशी रोखावी म्हणून बोलणं केलं…

 

लोकांनी स्वाक्षरी करून, रक्ताचे शिक्के उमटवत पत्र सुद्धा लिहिले…

 

#क्रांतीगाथा भाग ७

 

पण भगतसिंगांना स्वतःलाच ती फाशी हवी होती…

 

” तो स्वतः च बोलला मै ऐसी कैद भरी  जिंदगी नही जी सकता और मै क्रांतिकारक हु ब्रिटिश हुकुमत मुझपर गोलीया चलाये….

आणि लाहोर जेलला तो फोन आला…

फासी एक दिवस अगोदर द्यायची आहे…

 

२३ मार्च १९३१ , १४ नंबर च्या कैदखान्याचे गेट हलले , तो तेवीस वर्षाचा भगत लेनीन वाचत बसला होता, पुस्तकाचं शेवटचं पान अपुर्ण होतं , एका क्रांतिकारकांची भेट दुसऱ्या क्रांतिकारकांशी अपुर्ण ठेवून भगत बाहेर आला….

 

#क्रांतीगाथा भाग ६

 

राजगुरु आणि सुखदेव यांना बाहेर काढण्यात आलं तीघांचे वजन करण्यात आले  , अंघोळ झाली…

 

आणि तो क्रांतिकारकांचा जथ्था बाहेर पडला….

 

अवघं लाहोर चं सेंट्रल जेल हादरलं..

 

इंकलाब जिंदाबाद चे नारे जोरजोर्याने लागत होते, सर्व क्रांतिकारक या तीन मित्रांना अखेरचा निरोप देत होते…

 

तिघांच्या डोळ्यात इंकलाबी चा जज्बा जमला… ओठात शब्द उमटले…

 

” मरके कैसे जीते है…इस्स दुनिया को बतलाने तेरे लाल चले है माये अब तेरी लाज बचाने…

आझादी का शोला बनके खुन रगो मज डोला ….माये रंग दे बसंती चोला…

खुश रहो ए अहले.वतन अब हमतो सफर करते है….

पर….पर….!!

दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत की….मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन आयेगी….!!

आणि हसुन जेलर ला भगत म्हणाला…

 

“खुशनसिब हो  तुम जो आज.देख पा रहे हो की क्रांतिकारक अपने वतन के लिये कैसे मौत को हसकर गले.लगाते है….!!

 

फाशीचे तख्त दिसताच तिघाचा वेग वाढला जणू एकमेकाशी फाशी वर अगोदर कोण चढणार म्हणून स्पर्धाच  लागली होती…

 

तख्तावर येताच अखेर इच्छा म्हणून तिघांच्या हातांना मोकळे करण्यात आले…

 

तीघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली…

 

भगतसिंग जोर्याने ओरडला

” इंकलाब जिंदाबाद… !! “

आणि राजगुरु सुखदेव म्हणाले….

 

भगतसिंग जिंदाबाद….

 

तिघांच्या तोंडावर काळा कपडा चढला , हात बांधण्यात आली… आणि संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनटांनी तिघांचे स्वप्न पूर्ण झाले….

 

वतन के लिए शहादत का ख्वाब…..

 

या स्वतंत्रदिनी या सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन🇮🇳

 

” पर हम है तुममे , सबमे…..की जब जब वतन के लिए खडे होने का वक्त आये तो ये क्रांतीगाथा तुममे तब भी जिंदा है…..!! “

 

भारत माता की जय…..🇮🇳

✍🏻अक्षय चंदेल © 

#जिगरे

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir