“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

यशवंतराव

मंडळी भारतीय देशामध्ये स्वतःच्या नेतृत्वाची ख्याती निर्माण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल राजकीय क्षेत्रातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वाविषयी चांगलाच परिचित आहे.

 

पण यशवंतराव चव्हाण यांना वाटलं असत तर ते भारतीय देशाचे प्रधानमंत्री झाले असते हे आपल्याला माहिती आहे काय? याच प्रकरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

 

तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधी पक्षाच सरकार स्थापन झालं होतं. हे सरकार होत जनता पार्टीच.

 

जे समजावादी पक्ष, जनता दल आणि कम्युनिस्ट विचारधारेच्या पक्षांनी मिळून स्थापन केल होत. मात्र या सरकारमध्ये हिंदुत्ववादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारेचा वैचारिक संगम झाला नाही.

 

आणि काही कालावधीतच जनता पार्टिच सरकार कोलमडून पडलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण हे विरोधीपक्षनेते होते.

 

तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाण यांना सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबद्दल इंदिरा गांधींशी चर्चा करून कळवण्याचे सांगितले.

 

गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

 

त्यावेळेस नीलम संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी यांच्यातील वाद हा संपूर्ण देशाला चांगलाच माहिती होता. आणि तेव्हा काही कारणास्तव इंदिरा गांधींशी चर्चा करण्याबाबत अनुकूल परिस्थितीसुद्धा तेव्हा नव्हती. 

 

पवारांचा यशवंतराव चव्हाणांना सल्ला…

 

मंडळी यशवंतराव चव्हाण यांना तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून कळवण्याचे राष्ट्रपतींना सांगितले.

 

मात्र चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले शरद पवार यांनी इंदिरा गांधीकडे न जाता स्वतः सरकार स्थापन करण्याचा सल्ला चव्हाणांना दिला.

 

मात्र ज्यांच्यामुळे आपण राजकारणात अग्रेसर झालो त्यांना न सांगता सरकार स्थापन करणे योग्य नाही असा विचार करून शरद पवारांचा सल्ला टाळून ते इंदिरा गांधींशी सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा करायला गेले.

 

आणि इंदिरा गांधींनी तेव्हा त्यांना यावर नंतर निर्णय घेऊ असे सांगितले. पण इंदिरा गांधी यांनी काही दिवसातच चौधरी चरण सिंह यांची प्रधानमंत्री म्हणून घोषणा केली व यशवंतराव चव्हाण यांना उपप्रधानमंत्री करण्यात आलं.

 

आणि यशवंतराव चव्हाण हे प्रधानमंत्री पदापासून वंचित राहले.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir