आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

वसंतसेना

मंडळी ६०च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारा पक्ष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. अस म्हणतात की मराठी माणसाचा सावभिमान जागृत करण्यासाठी शिवसेनाच उभी राहली होती.

 

मात्र १९६६ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. ज्यामध्ये भर पडली होती ती म्हणजे शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल जात होतं.

 

काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?

 

याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव नाईक हे १९६३ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली.

 

पण आपल्याला जाणून आश्चर्य होईल की वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा भाग होता तो म्हणजे शिवसेनेची स्थापना. तुम्ही म्हणाल की मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि त्यांचा शिवसेनेशी काय संबंध?

 

तर मंडळी १९६० च्या दशकामध्ये आंदोलने, कामगार चळवळी अत्यंत जोर धरायला लागल्या होत्या. कामगार चवळींमधून अनेक नवीन चेहरे उगम पावत होते. त्यानंतर मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी आणि भूमीपुत्रांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.

 

राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका…

 

तेव्हा डाव्या पक्षांचा प्रभावसुद्धा जनतेमध्ये जोर धरायला लागला होता. म्हणून अस म्हणतात की डाव्या पक्षांचा हाच प्रभाव कमी करण्यासाठी वसंतराव नाईक आणि काँग्रेसने शिवसेनेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यायला सुरवात केली होती.

 

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

 

मंडळी डाव्या पक्षांचा वाढता प्रभाव ही शिवसेनाच कमी करू शकते असा विश्वास वसंतराव नाईक आणि काँग्रेसला झाला होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे पाठींबा द्यायला सुरुवात केली. याच कारणामुळे वसंतराव नाईक आणि शिवसेनेच्या जवळीकतेवरून शिवसेनेला वसंतसेना म्हणून हीनवल्या जाऊ लागलं.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir