जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

आनंद दिघे

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर करून ठेवलं.

 

होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

 

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

 

अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

 

एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

 

मात्र संपूर्ण ठाण्यामध्ये दरारा असणाऱ्या आनंद दिघेंची कॉलर एका टीसीने पकडल्याचा किस्सा शिवसेनेच्या राज कल्याणकर यांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की,

 

” १९७६ साली देशात आणीबाणी पुकारण्यात आली. साबीर शेख यांच्यावर मिसा लावण्यात आला. पोलीस साबीर शेख यांना शोधत होते. काहीदिवस पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर साबीर भाई पोलिसांच्या हाती लागले. साबीर भाई यांना झालेली अटक आणि त्यांना कोठे नेणार हे सर्व गुप्त ठरवण्यात आले होते.”

 

जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

 

पुढे बोलताना कल्याणकर सांगतात की,

 

” परंतु ती बातमी आम्हाला समजली. रात्री उशीराच्या गाडीने साबिरभाई यांना विसापूरच्या कारागृहात नेण्यात येणार आहे. आम्ही धावत पळत कल्याण रेल्वेस्टेशनवरून गाडी पकडली. कोणाकडेही तिकीट नव्हती. गाडीमध्ये एक उंचपुरा भैया टीसी आला आणि थेट आनंद दिघे यांना बघून त्यांची कॉलर धरली. मग गाडीतील शिवसैनिकांनी त्याला योग्य तो धडा शिकवला.”

 

हा किस्सा राज कल्याणकर यांनी सांगितला आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir